* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANDHA BADALTANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669473
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE WERE MORE THAN SIX HUNDRED AND FIFTY PRINCELY STATES IN INDIA AT THE TIME OF INDEPENDENCE. THESE WERE NOT UNDER THE DIRECT RULE OF BRITISH. THEY WERE ALL INDEPENDENT RULERS. A FEW OF THEM HAD EVEN STARTED THEIR OWN RAILWAYS. BARODA WAS ONE SUCH STATE. THE FIRST RAILWAY TRACK IN INDIA WAS BUILT IN 1853 FROM BORIBANDAR (NOW NAMED AS CHHATRAPATI SHIVAJI TERMINUS OR CST) TO THANE BY A BRITISH COMPANY UNDER THE BRITISH SUPERVISION. THIS IN TURN HELPED IN FAST PROGRESS OF OUR NATION. RAILWAY HELPED IN BUSINESS AS TRANSPORTATION BECAME EASIER. SEEING THE GOOD RESULTS OF RAILWAY, THE STATESMEN WERE NATURALLY INCLINED TO BUILD THEIR OWN RAIL TRACKS. THE FIRST RAIL TRACK WAS THUS BUILT BY THE STATE OF BARODA IN 1862. BUT OWING TO SOME TECHNICAL DIFFICULTIES A TRAM PULLED BY BULLOCK CART WAS ALL THAT COULD RUN INSTEAD OF THE STEAM ENGINE DRIVEN RAILWAY. FINALLY, AFTER
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात सुमारे साडेसहाशे संस्थानं होती. ही संस्थानं ब्रिटिश अमलाखाली नव्हती. त्यांची स्वत:ची स्वतंत्र राज्यव्यवस्था होती. त्यांच्यापैकी काहींनी स्वत:ची रेल्वेही सुरू केली होती. बडोदा हे अशा संस्थानांपैकी पहिलं. भारतातला पहिला रूळमार्ग (रेल्वे) ब्रिटिश अमलाखालच्या भागात बोरीबंदर (आताचं सी.एस.टी. – छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाणे असा १८५३ साली बांधला गेला आणि देशात वेगाचं युग सुरू झालं. हे काम एका ब्रिटिश वंÂपनीनं केलं होतं. रेल्वेमुळे व्यापार जोमानं वाढू लागला आणि दळणवळण सुलभ झालं. त्या अनुभवावरून संस्थानिकांनाही आपल्या राज्यात रेल्वेसेवा सुरू करण्याची इच्छा झाली नसती तरच नवल. सर्वांत पहिला संस्थानी रूळमार्ग सुरू करण्याचा मान बडोदा संस्थानाकडे जातो. ते काम १८६२ साली सुरू झालं, पण तांत्रिक त्रुटींमुळे वापेÂच्या इंजिनानं ओढल्या जाणाNया आगगाडीऐवजी बैलांनी ओढली जाणारी ट्रॅम सुरू झाली. अखेर १८७३ साली डभोई ते करजण-मियागाम हा साधारण २० मैलांचा (३१-३२ कि.मी.) रूळमार्ग सुरू झाला. तेव्हा बडोद्यावर मल्हारराव गायकवाड राज्य करत होते. हा मार्ग सुरू होण्याच्या काळात बडोद्यात बरीच राजकीय उलथापालथ होत होती आणि त्यामुळे समाजजीवन ढवळून निघत होतं. बडोद्यातील ब्रिटिश रेसिडेंट आणि मल्हारराव यांच्या संघर्षाचा तो काळ होता. ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावाचा काळ होता. अखेरीस ब्रिटिशांनी मल्हाररावांना पदच्युत केलं आणि सयाजीराव गायकवाड राज्यावर आले. १८७५ पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. या काळातल्या बडोद्यातील धामधुमीचं आणि बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचं चित्रण करणारी शुभदा गोगटे यांची ही कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SANDHA BADALTANA #SHUBHADA GOGATE #NARAYAN #LAXMI #DURGA #VISHWNATH #KAVERI #RAMABAI #KHANDERAO #BARODA #MUMBAI #ENGINE #STATION #1853 #MALLHARRAO GAIKWAD
Customer Reviews
  • Rating StarLOKSATTA 12-04-2009

    `संस्थानी कारभाराचा सांधा बदलताना`… आपल्या देशामध्ये पूर्वापार राजेरजवाड्यांची सत्ता चालत आली आहे. या राजेरजवाड्यांच्या मनमानी आणि एककल्ली कारभारामुळे परकियांना आपली वसाहत येथे स्थापन करण्यास वेळ लागला नाही. समाजातील जाती-पोटजातीचे फुकाचे मोठेपण आणिसत्ताधीशांचे एककल्ली राजकारण यातूनच ब्रिटिशांना आपल्या देशात पाय रोवण्याची संधी मिळाली, पण समाजापासून आणि जनतेपासून फटकून राहणाऱ्या संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये एक होते बडोद्याचे संस्थानिक! त्याकाळी म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या खंडप्राय देशातील प्रगत संस्थानांपैकी एक होते बडोदा संस्थान आणि त्याचे संस्थानिक गायकवाड घराणे. सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि अनेक सामाजिक बदलांची नांदी घडवून आणली, पण सयाजीराव गायकवाडांनी ही नांदी घडवली ती त्या संस्थानाच्या सुधारणावादी संस्कृतीचा कळस होता असे मानायला हरकत नाही. बडोदे संस्थानला लाभलेले गायकवाड घराणे हे अन्य संस्थानिकांपेक्षा वेगळे होते. घराण्यात अंतर्गत वाद, कलह होते पण समाज जागतिक स्तरावर किती पुढारलेला आहे, याची नोंद वेळोवेळी घेत, नव्या बदलांचे स्वागत या घराण्याने केले आहे. इतकेच नाही तर प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या साधनांचा उपयोग आपल्या राज्यात कसा करता येईल, याबाबतही विचार होत असे. ब्रिटीशांनी १८५३ मध्ये भायखळा म्हणजे मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सुरू केली. ती प्रामुख्याने दळणवळण अधिक गतीने व सुलभ व्हावे यासाठी! पण यामुळेच या शहराच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला गती मिळाली. ब्रिटीशांचा अंमल सर्व संस्थानांवर नव्हता. ब्रिटीशांनी रेल्वे सुरू केली आणि त्यातून साधली जाणारी प्रगती पाहून बडोदा संस्थाननेही स्वत:च्या संस्थानात रेल्वे सुरू केली. अर्थात तांत्रिक कारणामुळे ही रेल्वे सुरू न होता ट्राम सुरू झाली. सयाजीराव गायकवाड दत्तक म्हणून या संस्थानाच्या राजेपदी बसण्यापूर्वीचा काळ हा संस्थांनी राजकारणाच्या धामधुमीचा काळ होता. खंडेराव गायकवाड आणि मल्हारराव गायकवाड या भावंडांमध्ये धुसफूस सुरू होती. खंडेराव पोटाच्या विकाराने आजारी होते तर मल्हाररावांना तुरूंगात ठेवण्यात आले होते. या दन भावंडांच्या वादात दरबारी अधिकारी आणि काही प्रतिष्ठित जनता यांच्यातही दोन भाग पडले होते. खंडेरावांच्या निधनानंतर मल्हारराव सत्तेवर आले. खंडेरावांच्या काळात तेथे असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचे वर्चस्व दरबारावर होते, ते काही प्रमाणात कमी झाले. ब्रिटिशांच्याच मदतीने बडोदा संस्थानात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न कूर्मगतीने सुरू होता विंâबहुना तो थांबलाच होता. अशा वेळी या कामी `नारायण` संस्थानच्या मदतीला आला. शुभदा गोगटे यांची `सांधा बदलताना` ही कादंबरी या बडोदा संस्थानच्या एकूण सामाजिक-राजकीय परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी आहे. १८६० ते १८७५ या संपूर्ण कालावधीतील बडोदा संस्थानमधील सामाजिक चित्र उभे करतानाच सरकारी पातळीवर कोणतीही योजना कशी राबवली जाते, त्यात कोणकोणते अडथळे येतात, ते अडथळे कसे दूर होतात याचेही बारकावे वाचायला मिळतात. डभोई ते करजण हा २० मैलांचा रेल्वेमार्ग सुरू व्हावा यासाठी बडोदे संस्थान `नारायण` च्या मदतीने प्रयत्न करत असतानाच काही विघ्नसंतोषी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या मदतीने कसा अडसर आणतात, हेही वाचायला मिळते. नारायण हा सर्वसामान्य मराठी कुटूंबातला मुलगा. रेल्वे इंजिनांच्या आवडीमुळे तो रेल्वेत कामाला लागतो. घरच्या पातळीवर तत्कालीन संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे पत्नीचा झालेला छळ तो सहन करू शकत नाही आणि तो विभक्त होतो. पण बऱ्याच वर्षांनी तो घरी येतो तेव्हा घराचे बदललेले रूप पाहून तो अचंबित होतो, पण नंतर पुन्हा आपल्या प्रपंचाकडे वळतो आणि एक नवे आव्हान त्याला बडोदे संस्थानमध्ये रेल्वे सुरू करण्याच्या निमित्ताने मिळते. या कादंबरीत नारायणचे घर आणि नंतर बडोदे संस्थानमधील त्यांची कामगिरी याचा सांधा साधताना लेखिकेची लेखनगती वेगवेगळ्या पातळीवर होते आणि मध्ये सांधा बदलताना नाही तर निखळलेला वाटतो, पण ओघवत्या लेखनशैलीमुळे हे वाचकांच्या विशेष लक्षात येणार नाही. कादंबरीतील सर्वच पात्रे बदलत्या परिस्थितीत स्वत:मध्ये बदल करताना आढळतात. म्हणजेच ते त्यांच्या जीवनाचा सांधा बदलतात. सरळमार्गी जीवन जगताना अनेकदा असा सांधा बदलणे अपरिहार्य असते. त्यातूनच जीवन प्रगतीकडे नेता येते. संस्थानिक आणि ब्रिटिश रेसिडेंट यांच्यातील तो संघर्षाचा काळ होता. १८५७ मध्ये झालेल्या उठावामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. ब्रिटिशांचा प्रभाव वाढू लागला होता. मल्हारराव गायकवाड यांच्या काहीशा छंदीफ़ंदी स्वभावामुळे वैतागलेल्या रेसिडेंटने अखेर मल्हाररावांना सत्ताभ्रष्ट केले आणि दत्तक विधानाच्या माध्यमातून सयाजीरान गायकवाड सत्तेवर आले. या सवे प्रकारात डभोईकरजण रेल्वे सुरू झाली खरी, पण नारायणला पुन्हा आपल्या जागी परतावे लागले. मोठ्या उत्साहाने संपूर्ण कुटूंबासहित बडोद्याला आलेल्या नारायणला तसेच त्याच्या कुटूंबाला परतावे लागते. आपल्या संयुक्त कुटुंबापासून दूर जाताना नारायणने सांधा बदलला, बडोदे संस्थानची नोकरी पत्करताना त्याने दुसऱ्यांदा सांधा बदलला आणि शेवे सत्तसंघर्षातून आपल्याच गावी परतताना त्याला पुन्हा सांधा बदलावा लागला. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर असा नारायणचा सांधा बदलला, त्याचीच ही कहाणी! - प्रसाद मोकाशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

THE VAULT OF VISHNU
THE VAULT OF VISHNU by ASHWIN SANGHI Rating Star
बाबुराव रामजी.

आज कित्येक वर्षानंतर ३०० पानी कादंबरी सलग वाचून संपवली! अश्विन सांघी यांनी लिहिलेली `दि व्हॉल्ट ऑफ विष्णू` ही #कादंबरी म्हणजे एक प्राचीन आणि सद्य परिस्थितीशी मेळ घालणारी थरारक #रहस्य कादंबरी आहे. दीड हजार वर्षांपूर्वी चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने ारताला भेट दिली होती. त्याच्या प्रवासाचे चित्रण व त्याला अनुसरणाऱ्या सद्यपरिस्थितीचे कथानक असा मेळ घालणारी ही कादंबरी आहे. #भारत आणि #चीन या २१ व्या शतकामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. शिवाय दोघेही सख्खे शेजारी असल्यामुळे स्पर्धा देखील प्रत्येक पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. चार वर्षांपूर्वी चीनने भारताच्या डोकलाम येथे भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावर बराच गदारोळ देखील उठला. याच पार्श्वभूमीचा वापर करून लेखकाने भारत आणि चीन प्राचीन संबंधांपासून आज असलेल्या संबंधांपर्यंतचा लेखाजोखा या रहस्य कादंबरीमधून मांडलेला आहे. ह्यूएन त्संगचा प्रवास आणि आजच्या भारत व चीन मधील घडामोडी हे दोन्ही प्रसंग समांतर पद्धतीने या पुस्तकात रेखाटण्यात आलेले आहेत. ह्यूएन त्संगचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी, अवघड आणि विविध साहसं व नशिबाने भरलेला जाणवतो. आपल्या लेखणीने लेखक आपल्याला दीड हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातो. विशेष म्हणजे या प्रवास वर्णनात वापरलेली स्थळांची सर्व नावे तत्कालीन आहेत. यातूनच प्राचीन भारतातील बौद्ध संस्कृतीची घट्ट पकड देखील आपल्याला ध्यानात येते. तत्कालीन बौद्धमय भारत कसा होता, हे देखील अनुभवयास मिळते. सुरुवातीलाच या चिनी प्रवाशाच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग स्थळांसहित नकाशामध्ये दाखविण्यात आलेला आहे. कदाचित तो नकाशा नसता तर कादंबरीतील वर्णन सुरस वाटले नसते. काही वर्षांपूर्वी तमिळ भाषेमध्ये अभिनेत `एल्लम अरीवू` (हिंदी भाषांतरित-चेन्नई टु चायना) हा चित्रपट बनविला होता. बोधिधर्म या बौद्ध भिक्खूच्या चीन प्रवासावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. याच बोधिधर्मचा प्रवास व कर्तुत्व देखील कादंबरीमध्ये वाचायला मिळते. यात अनेक पात्रे आहेत, शेकडो घटना आहेत. परंतु त्यांचा मेळ अतिशय उत्तमरीत्या लेखकाने बसविल्याचा दिसतो. अतिशय शांतपणे व एकाग्र चित्ताने ती वाचल्यास त्याचे थरारकनाट्य व रहस्यभेद हे वाचनाची खरीखुरी अनुभूती देतात. तीन-चार ठिकाणी झालेले रहस्यभेद हे अनपेक्षित वाटून जातात, यातच लेखकाचे यश सामावलेले आहे! ...Read more

THE WOMAN IN THE WINDOW
THE WOMAN IN THE WINDOW by A. J. FINN Rating Star
Vijay Kelkar

Beautifully pen down by author and equally translated in Marathi by Mrs.Savani Kelkar Pune! This book is must read book cause this has a background of English Hollywood movie "The Woman In The Window which was released in post pandemic period! Overll layout,cover,printing shows the enormous efforts taken by publishing house to make this book more tempting to read ! I congratulate Mrs.Savani to get this book in Marathi language for Marathi readers all over world ! Cover page of this book is really a A Cherry On The Top ! And content .... Wow.... It`s suspence!!! Friends do buy this book from authorised shop and read in just one sitting ! And this book will enhance your beauty of your book shelf at your house or any other establishment ! My best compliments to all Mehta Publishers staff who took lot of efforts to get this beautiful book in the readers market ! Good Luck ! ...Read more